प्रतिनिधी/ सातारा
पालिकेत कोणाचाच कोणाला धरबोळ राहिला नाही. प्रत्येक विभागात अळमटळमपणा सुरु असल्याचे दिसून येत आहे. वसुली विभागात तर वसुलीच्या नावाखाली सगळेच टेबल रिकामे आहेत. एखादी समस्या घेवून आलेल्या नागरिकांना समस्येचे निराकरण करण्याकरता एकही कर्मचारी, अधिकारी जाग्यावर नसल्याने गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वसुली विभागाची केबीनही बंद अवस्थेत आहे. ऑडिटच्या नावाखाली सर्व विभागात अळमटळमपणा सुरु असल्याचेही दिसत होते.
सातारा पालिकेत शहरवासियांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. अधिकारी, कर्मचाऱयांवर वचक नसल्याचे अनेकदा प्रत्यय आला आहे. शनिवारी पालिकेत वसुली विभागात शुकशुकाट होता. मार्च महिना जवळ येवू लागल्याने पालिकेच्या वसुली पथकाच्या गाडय़ा फिरु लागल्या खऱया, परंतु एकही कर्मचारी व अधिकारी टेबलवर नसल्याने समस्या घेवून आलेल्या नागरिकांचे निराकारण होणार तरी कसे?, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, शनिवारी एन. डी. वालुगडे हे नागरिक त्यांना आलेल्या बिलाच्या नोटिसीबाबत विचारणा करुन बिल भरण्याची दुरुस्तीकरता कोणीच नसल्याने समाधान होवू शकले नाही. ते परत गेले. वसुली विभागात नव्यानेच कोणीतरी महिला अधिकारी आहे, त्याही केबीनला नव्हत्या. तसेच शहरविकास विभागातही नव्याने जे कर्मचारी आले आहेत. ते आपल्या खुर्चीत बसून मोबाईलवर दंग होते. दरम्यान, गोडसे आणि साखरे हे दोघेही कामात मग्न असल्याचे दिसत होते. पाणी पुरवठा विभागात बावणे आणि एक महिला कर्मचारी दिसत होते. बांधकाममध्ये तर लिपिकांच्यामध्ये दोघेजण होते. सकाळी 11.30 च्या दरम्यानची ही परिस्थिती सातारा पालिकेत दिसत होती.::