प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील अनेक भागात बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे काजू, आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. पावसामुळे काजू उत्पादनाचे नुकसान झाल्यास शेतकऱयांत उदरनिर्वाहाची चिंता निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे आंबा उत्पादनावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
बुधवारी पडलेल्या पाऊस व वादळी वाऱयामुळे सत्तरी तालुक्मयातील आंबा व काजूच्या झाडावरील मोहोर गळून पडला. यामुळे याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार अशा प्रतिक्रिया उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत. जवळपास एक तास वादळी वारा झाला. सत्तरी तालुक्मयातील जवळपास 70 टक्के लोक आंबा व काजूच्या उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करतात. मात्र यंदा हवामानात सातत्याने होणाऱया बदलामुळे याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ लागलेला आहे.
दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे पाऊस पडला होता. त्याचे परिणाम आता काजूच्या उत्पादनात स्पष्टपणे दिसून येऊ लागलेले आहेत. झाडावर तयार झालेल्या काजूबिया काळपट दिसत असून काजूच्या विक्रीवर परिणाम होतो. काजूगराला काळा रंग चढला असून बाजारपेठेत अशा प्रकारचे काजू खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. दरम्यान, यंदाचा काजू हा मोठय़ा प्रमाणात काळा पडू लागला आहे. यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर तसेच काजू उत्पादकांच्या आर्थिक व्यवस्थापनावर होण्याची शक्मयता वाळपई गोवा बागायतदार खरेदी-विक्री विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.
पाऊस काजू उत्पादनास लाभदायक ः विश्वनाथ गावस
दरम्यान यासंदर्भात वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बुधवारी पडलेल्या पावसाचे चांगले परिणाम येणाऱया काळात काजू, आंब्याच्या उत्पादनावर होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होणाऱया बदलांमुळे मोहोर काळा पडला होता. बुधवारी पडलेल्या पावसामुळे मोहोर पूर्णपणे गळून पडला. यामुळे सदर ठिकाणी नवीन पालवी फुटण्याची शक्मयता आहे. मात्र या उत्पादनाला बऱयाच प्रमाणात उशीर झाल्यास जूनमध्ये येणाऱया पावसात उत्पादनाला अपेक्षित प्रमाणात बाजारपेठ मिळणे कठीण आहे. यामुळे उत्पादन होऊनही त्याचा कोणताही फायदा होणार नाही.
दरम्यान यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काजू, आंबा उत्पादक दत्ता सावंत यांनी सांगितले की बुधवारी पडलेल्या पावसामुळे उत्पादनाचे नुकसान होणार आहे. यंदाच्या काजू मोसमाला मोठय़ा प्रमाणात उतरती कळा लागली आहे. त्यातच आता पडलेल्या पावसामुळे उत्पादकांसाठी नवीन संकट निर्माण होऊ शकते.