वाळपईत सरकार तुमच्या दारी कार्यक्रमात स्थानिक लोप्रतिधिनींची मागणी, मंत्री नीलेश काब्राल यांच्याशी साधला संवाद
प्रतिनिधी /वाळपई
सरकारने नव्याने सुरू केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ वाळपई येथील कार्यक्रमात सत्तरी तालुक्मयातील अनेक सरपंच, पंच व नगरसेवकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई व रस्त्याची बिकट अवस्था यासंबंधी सर्वाधिक प्रश्न मांडले. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई व रस्त्यांची समस्या दूर करून खात्याकडे मांडलेले अनेक प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.
वाळपई नगरपालिकेच्या सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, नगराध्यक्ष सेहझीन शेख, जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, देवयानी गावस, राजश्री काळे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विभागांचे अधिकारी सर्वश्री देवेंद्र वेलिंगकर अरविंद सावईकर, झिलबाराव देसाई, चंदन नाईक, गुरुदास गोखले, संतोष मापणे, सुधीर परब, नारायण तिवरेकर, विलास तांबोसकर, सोमा नाईक, संतोष लाड, सुनील जल्मी, रोहिदास नाईक, गणेश गावकर, प्रशांत गावडे, गोवा प्रदूषण महामंडळाचे चेअरमन महेश पाटील, गौरंग देसाई, गोवा प्रदूषण महामंडळाचे संचालक दशरथ रेडकर व इतरांची खास उपस्थिती होती.
पिण्याच्या पाण्याची टंचाईबाबत अनेकांचे प्रश्न
दरम्यान ससत्तरी तालुक्मयामध्ये भासणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या बैठकीमध्ये बराच गाजला. विविध पंचायतीचे सरपंच, पंच व नगरसेवकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, तसेच दाबोस पाणी प्रकल्पाची क्षमता वाढवा, विविध पंचायत क्षेत्रामध्ये शक्मय असल्यास नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारा अशी मागणी अनेक पंचसदस्यांनी केली.
नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सेहझीन शेख व नगरसेवक रामदास शिरोडकर यांनी पालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गतिरोधक उभारणे व दाबोस पाणी प्रकल्पाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून गंभीर लक्ष द्यावे अशी मागणी केली.
पिसुर्ले पंचायतीच्या सरपंच देवानंद परब, जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, होंडा सरपंच शिवदास माडकर, पंच सदस्य स्मिता मोटे, पंच सदस्य दीपक गावकर, खोतोडा पंचायतीचे सरपंच नामदेव राणे, पंच सदस्य राजाराम परवार, सलोनी गावकर, रोहिदास गावकर, पर्ये पंचायतीच्या सरपंच रती गावकर, हेमंत राणे, आत्माराम शेट्टी, भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे, ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, पंच सदस्य निलेश परवार, विनायक गावस, सावर्डे पंचायतीचे उपसरपंच शिवाजी देसाई, नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर, पंच सदस्य रामू खरवत, मामू खरवत, राजेंद्र अभ्यंकर, चंद्रकांत मानकर, केरी सरपंच दीक्षा गावस, राजेश गावस, भिवा गावस, उस्मान सय्यद, माऊस पंचायतीचे सरपंच सोमनाथ काळे, मोर्ले पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर, पंच सदस्य रुपेश मळीक यांनी आपल्या प्रभागातील पाणी टंचाईसह रस्त्यांच्या समस्या मांडल्या.
दाबोस पाणी प्रकल्पाची क्षमता वाढविणे शक्मय
दाबोस येथे 15 एम एल डी क्षमतेचा पाणी प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाची क्षमता वाढविल्यास अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई दूर करता येणार आहे. या संदर्भाचा प्रस्ताव सरकारला सादर केला असून तो शक्मय तेवढय़ा लवकर मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मंत्री नीलेश काब्रल यांनी उपस्थितांना दिले. त्याचप्रमाणे शक्मय असल्यास मोर्ले येथे नवीन प्रकल्प उभारून त्याचा पाणीपुरवठा पर्ये, मोर्ले, होंडा, पिसुर्ले आदी भागांमध्ये देणे शक्मय असल्याचे सांगून त्या संदर्भात गांभीर्याने विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
येणाऱया काळात विविध खात्याचे मंत्री अशाच उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असे यावेळी आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले तर शेवटी त्यांनीच आभार मानले.