प्रतिनिधी/ बेळगाव
कूपनलिकेचे पाणी सिन्टेक्स टाकीद्वारे पुरवठा करण्यात येणाऱया योजनेच्या देखभालीकरिता वर्षाकाठी लाखाचा निधी खर्ची घातला जातो. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी हिंडलगा ग्राम पंचायतीजवळ आरओ प्लांट बसविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात आरओ प्लांटची देखभाल केली जात नसल्यामुळे पाण्याची समस्या भेडसावत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशातच विहिरी, कूपनलिकांमधील पाणी कमी झाल्याने पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना नळावाटे पुरवठा करण्यात येणाऱया पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. हा पुरवठा सुरळीत नसल्याने काही ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंडलगा परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने विहिरींची खोदाई आणि जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतशेजारी आरओ प्लांट बसविण्यात आला आहे. या प्लांटची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने वारंवार बंद पडत आहे. हिंडलगा परिसरातील विहिरींचे पाणी दूषित असल्याने आरओ प्लांटच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयाजवळील आरओ प्लांटवर पाणी घेण्यासाठी नागरिकांची कायम गर्दी असते. या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा केला जात नसल्याने आरओ प्लांटवर पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. प्लांटची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने याबाबत जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी याची पाहणी केली असता, ग्राम पंचायतीकडून सुरळीत पाणीपुरवठा केला जात नसल्याने आरओ प्लांटचा विद्युतपंप वारंवार खराब होत आहे. पंप खराब झाल्यास चाळीस हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे. ग्राम पंचायतीमुळे हा भुर्दंड बसत असल्याची माहिती देखभाल करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली. पण पाणी नसतानादेखील नागरिकांच्या कार्डमधून पैसे वजा होत आहेत. बहुतांशवेळा पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड बसत आहे.
तीन ठिकाणी आरओ प्लांट
हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत तीन ठिकाणी आरओ प्लांट बसविण्यात आले आहेत. यापैकी ग्राम पंचायत कार्यालय, विजयनगर आणि बॉक्साईट रोडवरील मास्तेनगर परिसर या ठिकाणी आरओ प्लांट आहेत. पण विजयनगर आणि मास्तेनगर येथे कार्डद्वारे पाणी मिळत नाही. केवळ क्वॉईन टाकल्यास पाणी मिळते. पाणी पुरवठय़ाकरिता वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. पाणी घेण्यासाठी क्वाईन कुठून आणायच्या असा मुद्दा उपस्थित झाला आहे. ग्राम पंचायतकडून आरओ प्लांटची देखभाल केली जात नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तेंड द्यावे लागत आहे. याबाबत विकास अधिकाऱयांकडे तक्रार केली असता, ग्राम पंचायतच्या शिपायाकडे बोट करून जबाबदारी झटकत आहेत. यामुळे जिल्हा पंचायतीच्या वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे..