प्रतिनिधी / बेळगाव
पियुसी द्वितीय परीक्षेत मार्क अमान्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला गुरूवार दि. 19 पासून सुरूवात झाली. या परीक्षेसाठी विद्यार्थी तसेच पालकांनी महाविद्यालयांसमोर गर्दी केली होती. यावेळी बऱयाच विद्यार्थी व पालकांनी मास्कचाही वापर केला नसल्याचे दिसून आले.
एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी दहा विद्यार्थी बसविण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पियुसी व्दितीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली नव्हती. दहावी, अकरावी तसेच अंतर्गत मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे गुण मान्य नसल्याने त्यांनी परीक्षा देण्याचा निर्णय
घेतला.
त्यानुसार गुरूवारी विविध विषयांचे पेपर पार पडले. सरदार्स हायस्कूलसमोर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. त्याचबरोबर सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. मात्र केंद्रासमोर उभे असलेल्या पालकांनी मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आले.