ऑनलाईन टीम / बीड :
राज्यातील शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे न दिलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
मागील काही अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी शेतकऱयांना पीकविमा देणाऱया ओरिएंटल इन्शुरन्स आणि बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱयासमवेत बैठक घेतली. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे 2018 चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर बजाज कंपनीने अद्याप 7 लाख शेतकऱयांचे पीक विमा वाटप थांबविले आहे. त्यामुळे बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.
तसेच ओरिएंटल इन्शुरन्सने नाकारलेल्या 90 हजार शेतकऱयांच्या पिकविम्याबाबत 27 तारखेपर्यंत लेखी उत्तर देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.