बेंगळूर ; काँग्रेस पक्षामध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे. आमदार जमीर अहमद यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, आमदार जमीर अहमद आणि राघवेंद्र हिटनाळ यांनी केवळ आपले मत व्यक्त केले आहे. पुढील मुख्यमंत्री कोण व्हावा याबाबत पक्षातील वरि÷ नेतेच निर्णय घेणार आहेत. हायकमांडचा निर्णयच अंतिम असून जमीर अहमद आणि राघवेंद्र हिटनाळ यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त केले आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या हितदृष्टीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी योग्य वक्तव्य केले असून आपण सामूहिक नेतृत्त्वाखाली पुढे जाऊया, असे ते म्हटले आहेत. यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नेतृत्त्वाबाबत वरिष्ठ नेत्यांचा निर्णयच अंतिम असतो, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
Previous Articleलसीकरण मोहिमेत बेंगळूर प्रथमस्थानी
Next Article आणखी चार जिल्हे अनलॉक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.