ऑनलाईन टीम / मुंबई :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, पुढील 12 तासात त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज आणखी तीव्र होणार असून, ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने ते पुढे सरकणार आहे. त्यामुळे पुढील 12 तासात चक्रीवादळात त्याचे रुपांतर होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.