खासदार संभाजीराजे यांचे आवाहन, मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेला रायगड जिल्ह्यातून प्रारंभ, आरक्षणासह इतर मागण्यांकडे दोन्ही सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही केंद्र आणि राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांना जागे करण्यासाठी पुणे-मुंबई लाँग मार्च काढण्याच्या तयारीला लागा, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी केले.
रायगड जिल्ह्यातून संभाजीराजे यांनी मंगळवारी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळÎाला अभिवादन करून जनसंवाद यात्रेला प्रारंभ केला. खालापूर, कर्जत तालुक्यातील विविध गावात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संभाजीराजे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दोन्ही सरकार एकमेंकावर जबाबदारी झटकत आहे. अन्य मागण्यांकडेही गंभीरपणे पाहिले जात नाही. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुणे-मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केली.
रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि कर्जत तालुक्यातील खोपोली, वावोशी फाटा, पाली फाटा, खोपोली शीळ, पळसदरी, पोसरी, कडाव, करोळे, नेरळ या गावात जनसंवाद यात्रेचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. खोपोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळÎाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी संभाजीराजे यांचे स्वागत केले. जनसंवाद यात्रा प्रत्येक गावाच्या वेशीवर थांबल्यानंतर संभाजीराजे स्वागत स्वीकारून मराठा समाजाच्या मागण्या, राज्य सरकार, केंद्र सरकारची भूमिका, सद्यःस्थिती यांची माहिती देत. त्याचबरोबर आगामी लढ्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत होते.