ऑनलाईन टीम / सातारा :
लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी परिसरात घडली. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाली असल्याचे सांगण्यात येते.
रश्मी मिश्रा (वय 43) असे आत्महत्या केलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेचे नाव आहे. जयपूर येथील आर्मी इंटेलिजन्समध्ये त्यांचे पोस्टींग आहे. पुण्यातील आर्मी स्कूलमध्ये 6 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी त्या आल्या होत्या. 3 महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. कौटुंबिक वादातून आज सकाळी ट्रेनिंग स्कूलमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मिश्रा यांचे पतीही लष्करात कर्नल असून, दोघांमध्ये मतभेद होते. त्यांच्या घटस्फोटाचा अर्जही न्यायालयात प्रलंबित आहे.