वेंगुर्ले / प्रतिनिधी-
पुत्रवियोगाने मुलापाठोपाठ आईचेही निधन झाल्याची घटना वेंगुर्ले उभादांडा कांबळीवाडी येथे घडली आहे. उभादांडा कांबळीवाडी येथील रिक्षाचालक अरविंद कांबळी यांचे 30 मे रोजी अकाली निधन झाले होते. मुलांच्या अकाली जाण्याचे दु.ख अहय झाल्याने त्याची आई चंद्रीका भगवान कांबळी यांचेही 30 जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. मुंबई मंत्रालयातील सेवानिवृत्त लिपिक मंगेश कांबळी यांच्या त्या आई होत.