अचूक बातमी “तरुण भारत” ची, सोमवार, 3 मे, सकाळी 11.15
● बाधित वाढीचा नवीन उच्चांक ● रविवारी अहवालात 2,502 बाधित ● पॉझिटिव्हिटी रेट वाढताच 34.01 ● शनिवारचा मृत्यूदर उच्चांकी ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● बाधित वाढ कशी थांबणार याची चिंता?
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कम्युनिटी संसर्ग झालाय की काय याबाबत आरोग्य विभाग नेमके काय सांगत नाही. मात्र एखादा दिवस सोडला की पुन्हा येणारा दिवस बाधित वाढीचा नवा उच्चांक घेऊन समोर येत आहे. 30 एप्रिल रोजी वर्षातील 2,494 एवढी उच्चांकी बाधित वाढ नोंदवली गेली. 1 मे त्यादिवशी थोडीशी कमी पण 2,383 उच्चांकी वाढीने मे महिन्याचा आरंभ झाला आहे. तर रविवारी रात्रीच्या अहवालात देखील तब्बल 2,502 जणांचे अहवाल बाधित आल्याने आता स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. चिंतेचे सावट वाढलेले आहे. मृत्युदर ही कमी होत नसल्याने त्यावर कशी मात करायची ? बाधित वाढीचा वेग कसा रोखायचा याचं आव्हान जिल्ह्यासमोर आहे.
प्रशासनाला नव्याने आढावा घ्यावा लागेल
गतवर्षीच्या सप्टेंबर आक्टोंबर पेक्षाही बाधित वाढीचे उच्चांकी आकडे येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गत शुक्रवारी 2001 अशी भीतीदायक उच्चांकी बाधित वाढ समोर आली त्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यानंतर थोडासा वेग कमी झाला असताना 29 एप्रिल रोजी 2,256 तर 30 एप्रिल रोजी त्याहीपेक्षा भयंकर आकडा 2,493 समोर आल्याने जिल्ह्यातील वातावरण प्रचंड पॅनिक झालेले आहे. तर रविवारी गत वर्षभरातील बाधित वाढीचा नव्याने उच्चांक झालेला आहे. आता हे प्रचंड वेगाने होणारी बाजीत वाढ नेमकी कशामुळे याचा आढावा प्रशासनाला घ्यावा लागेल आणि त्यानुसार रणनिती आखावी लागेल.
लोक नियम पाळतात तरी वाढ कशी?
अनलॉकनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला होता. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नकार्य, आंदोलने आणि इतर ठिकाणी गर्दी केली जात होती. मास्कचा वापरही कमी झाला होता मात्र त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित वाढ होत नव्हती आता लॉकडाऊन सुरू असून लोक नियम पाळून घरात बसलेले असताना होणारी बाधित वाढ आणि तीही मोठ्या संख्येने ही अनाकलनीय आहे.
रविवारी उच्चांकी 2,502 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर शनिवारी रात्रीच्या अहवालात 2,217 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण 6 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,717 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 34.01 असा आहे. रविवारी रात्री च्या आवाजात देखील पॉझिटिव्हिटी रेट वाढलेलाच आहे.
बाधित वाढ रोखण्याचे आव्हान
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. बाधित वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकड्यांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 5,53,445, एकूण बाधित 1,07,427, एकूण कोरोनामुक्त 84,259, एकूण बळी 2,574, एकूण उपचारार्थ 20,620
रविवारी जिल्हय़ात बाधित 2,217, कोरोनामुक्त 440, बळी 44