वार्ताहर/प्रयाग चिखली
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे होऊन 2019 साली मिळालेल्या भरपाई प्रमाणेच योग्य भरपाई मिळावी. तसेच नियमित शेतीकर्ज परतफेड करणाऱया शेतकऱयांना दोन वर्षापूर्वी जाहीर केलेली पन्नास हजाराची मदत 1 सप्टेंबर पूर्वी मिळावी याच बरोबर इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाच सप्टेंबरला कृष्णा-पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रयाग चिखली येथे बोलताना दिला.
दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी 5 सप्टेंबर च्या जलसमाधी आंदोलनाची सुरुवात 1 सप्टेंबर पासून क्षेत्र प्रयाग चिखली (पंचगंगा नदी मुळ संगम) येथून पदयात्रेने करणार असल्याची माहिती दिली. यासंदर्भात शेतकऱयांना आंदोलनाबाबत मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने बुधवारी प्रयाग चिखली आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुयेवाडी, शिये येथील शेतकऱयांच्या भेटीगाठी घेतल्या.
दरम्यान करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील क्षेत्र प्रयाग संगमावरुन सकाळी नऊ वाजता हजारो शेतकऱयांच्या बरोबरीने नदी परिक्रमा मार्गानुसार प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुयेवाडी या मार्गाने शिरोळपर्यंत पदयात्रा काढून पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमस्थानी पाच सप्टेंबरला हजारो शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.
यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष -जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष- वैभव दादा कांबळे, करवीर तालुका उपाध्यक्ष विक्रम तिरपणकर, प्रयाग चिखलीचे एस. आर. पाटील, आबिद मुल्लानी, शामराव मांगलेकर, युवराज पाटील, भाजपाचे संभाजीराव पाटील, बाळासाहेब वरुटे रजपुतवाडीचे सरपंच रामसिंग रजपूत, संपतराव दळवी, कुमार दळवी आदीसह शेतकरी मोठÎा संख्येने उपस्थित होते…