पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
पूर्वपरवानगी घेतलेल्या संघटना व व्यक्तींनाच सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यास मुभा असणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे. त्यामुळे पूर्वपरवानगी न घेतलेल्या संघटनांना सोमवारी आंदोलन करता येणार नाही.
बेळगाव परिसरात घडलेल्या अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर दि. 22 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात 144 कलमानुसार जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्यानंतर संतप्त पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी काही कन्नड संघटनांनी सुवर्णविधानसौधला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वपरवानगी घेतलेल्या व्यक्ती, संघटनांनाच सुवर्ण सौध परिसरात अनुमती असणार आहे, असा आदेश पोलीस आयुक्तांनी काढला आहे.
खरेतर पोलीस आयुक्तांनी रविवारी दुपारी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशात सात अटी घालण्यात आल्या होत्या. सायंकाळी आणखी एक आदेश जारी करून आठवी अट घालण्यात आली आहे. सोमवारी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी बेळगावला येत असलेल्या संघटनांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आठवी अट घातली आहे.
शहर-तालुक्यातील जमावबंदी आदेशात वाढ : बुधवार 22 डिसेंबरपर्यंत असणार लागू
अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्मयात जमावबंदी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त दंडाधिकारी असणारे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची झालेली विटंबना, त्यानंतर बेळगाव येथे या घटनेचे उमटलेले पडसाद या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 20 डिसेंबरपर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. रविवारी जमावबंदीत वाढ करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
बुधवार दि. 22 डिसेंबरच्या सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी असणार आहे. सोमवारी अनेक कन्नड संघटनांनी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याची वल्गना केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गेले दोन दिवस बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जमावबंदीत वाढ करण्यात आली आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयात पाचहून अधिक जण एकत्रितपणे फिरू नये, शस्त्रs घेऊन फिरू नये, कोणीही प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत, व्यक्ती किंवा संघटनांबद्दल तेढ निर्माण होईल, असे भाष्य करू नये, आदी सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या असून अंत्ययात्रा, लग्न व इतर धार्मिक कार्यक्रमांना हा आदेश लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांना दिला आहे.