ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. आज भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्य असा पदकांचा चौकार लगावला.
भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने आज 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत 44.38 मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदकाची कमाई केली.
भालाफेकमध्ये देवेंद्र झाझारिया यांनी रौप्यपदक पटकावले. तर सुंदरसिंग गुर्जर यानेही कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे भारताच्या खात्यात आज 4 पदकांची भर पडली.