नवी दिल्ली
पेटीएम या कंपनीने येत्या काळात नव्याने 1 हजार जणांना नोकरी देण्याचे निश्चित केले आहे. येणाऱया काळात दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळूर येथे नव्या उमेदवारांची भरती कंपनी करून घेणार आहे. यापैकी 50 पेक्षा अधिक लोकांची वरि÷ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वित्त क्षेत्रात कार्यरत असणाऱया या कंपनीने विविध विभागात नव्या कर्मचाऱयांना सामावून घेणार असल्याचे सांगत त्यांच्यामार्फत व्यवसायाचा विस्तार अधिकाधिक केला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. येणाऱया काही महिन्यांमध्ये इंजिनियरसह वित्त तज्ञ आणि इतर तांत्रिक पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. वित्तीय व्यवस्थापन सेवा अधिकाधिक चांगली देण्यासाठी कंपनीचा यापुढे प्रयत्न असणार आहे. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत किमान 700 लोकांना भरती करून घेतले असल्याचे कंपनीने सांगितले आहे.