पाण्याचा प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिनिधी आपयशी
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील अनेक गावात सद्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही समाजसेवक टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पाणी टंचाई दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असताना पोरस्कडे येथील अँड. जितेंद्र गावकर यांनी याबाबत पाणी खात्याचे सहाय्यक अधिकारी वाल्सन आणि चांदेल येथील प्रकल्प अधिकारी बालाजी फडते यांची भेट घेऊन चर्चा केली. सात दिवसात हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आपण एक दिवसाचे उपोषण करणार आहे. असे लेखी निवेदन फडते यांना सोमवारी दिले आहे.
गेल्या काही महिन्यां?पासून पेडणे तालुक्मयातील अनेक गावात नळाला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे रोजच्या जीवनातील गरजा भागवणे कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. यासाठी अनेक वेळा अनेक आंदोलने झाली. कधी पेडणे मतदार संघात तर कधी मांदे मतदारसंघात अधूनमधून पाणी टंचाई निर्माण होते. संबंधित अधिकार्यांना घेराव घालणे, तर कधी पेडणे येथे येथील पाणी खात्याच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणे, कधी घागर मोर्चा काढला. असे प्रकार सुरू आहेत. एवढे करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्या ह्रदयाला पाझर फुटत नाही. पाणी टंचाईचा सर्वाधिक त्रास महिलांना सोसावा लागतो. त्यामुळे महिला वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
सद्या राज्यात उन्हाळा सुरू झाला असून या काळात पिण्याच्या पाण्याची गरज अधिक प्रमाणात भासते. पेडणे तालुक्मयातील गावागावांत घराघरांत नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने पारंपरिक विहिरी आणि नैसर्गिक झरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पेडणे तालुक्मयातील लोक नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
पेडणे तालुक्मयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेला सुरळीतपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी अँड. जितेंद्र गावकर यांनी पेडणे येथे जाऊन पाणी विभागाचे सहाय्यक अभियंता वाल्सन यांची भेट घेऊन पाणी टंचाई आणि पाणी वितरण याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना वाल्सन यांनी चांदेल आणि पेडणे असे दोन सार्वजनिक बांधकाम खात्याने विभाग सुरू केले आहेत. चांदेल येथून पुरवठा केलेल्या पाण्याचे गावागावांत वितरण करण्याची जबाबदारी हि पेडणे येथील विभागावर सोपवली आहे. त्यामुळे चांदेल पाणी प्रकल्पातून आलेल्या पाण्याचे वितरण करण्याची जबाबदारी आपली आहे. तर चांदेल पाणी प्रकल्पातून गावागावांतील जलकुंभात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी चांदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी बालाजी फडते यांची आहे. असे दोन विभाग बनवले आहेत. चांदेल पाणी प्रकल्पातून गावागावांतील टाकीत आवश्यक पाणी पुरवठा केला नाही तर मात्र नळाद्वारे पाणी टंचाई निर्माण होते. असे सहाय्यक अभियंता वाल्सन ( वितरण विभाग ) यांनी सांगितले.
दरम्यान अँड. जितेंद्र गावकर यांनी चांदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी सहाय्यक अभियंता बालाजी फडते यांची चांदेल येथे जाऊन भेट घेऊन पाणी पुरवठा आणि वितरणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अनेक प्रकारच्या उणिवा जाणवल्या. अधिकार्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱयांचा मनमानी कारभार याचा परिणाम गावागावांतील पाणी वितरणावर होतो. त्यासाठी चांदेल पाणी प्रकल्पातील कर्मचाऱयांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी गावागावात जाऊन पाणी पुरवठा कसा काय होतो याचा रोजच्या रोज आढावा घेणे आवश्यक आहे. हे बालाजी फडते यांना अँड. जितेंद्र गावकर यांनी चर्चेद्वारे पटवून दिले. यावर यापुढे पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल. असे आश्वासन दिले.
पेडणेचे लोकप्रतिनिधी अपयशी
पेडणेचे आमदार तथा गोवा उपमुख्यमंञी यांनी पेडण्याची पाणी समस्या सोडविण्यासाठी उपयोजाना करायला पाहिजे होती ती केली नाही. 15 एमएलडी पाणी प्रकल्प आता पेडणे तालुक्मयासाठी पुरेसा नाही. त्यासाठी नवीन प्रकल्पाची तातडीने तो उभारुन सोय करावी अशी मागणी अ?ड.जितेंद्र गावकर यांनी केली आहे. दरम्यान येत्या 7 दिवसात पेडणे तालुक्मयातील गावागावांतील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू न झाल्यास जनतेच्या हितासाठी त्यानंतर आपण चांदेल पाणी प्रकल्प परीसरात एक दिवसाचे उपोषण करणार आहे. याबाबतचे लेखी निवेदन अँड. जितेंद्र गावकर यांनी चांदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी बालाजी फडते यांना सोमवारी दिले आहे. पेडणे तालुक्मयातील पाणी प्रश्न सुटेपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आंदोलन करणार आहे. तसेच माहिती हक्काद्वारे माहिती प्राप्त करून वेळ प्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अँड. गावकर यांनी सांगितले. स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर हे पेडणे मतदारसंघात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी अपयशी ठरले आहेत. संपूर्ण पेडणे तालुक्मयातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असताना हळदी समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर नाचत असल्याने त्यांना पेडणे मतदारसंघातील जनतेचे सुखदुःख नाही. असे म्हणून अँड. जितेंद्र गावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.