लोकशाही मजबूत करण्यासाठी कर्तव्य पार पाडा, मुख्य जिल्हासत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
घटनेने प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेंव्हा प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मतदाराने बजावणे हे गरजेचे आहे. तेंव्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे यावे आणि लोकशाहीला बळकटी द्यावी, असे आवाहन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका व स्वीप समितीच्यावतीने मंगळवारी 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश सी. एम. जोशी हे बोलत होते. संपूर्ण जगाला भारताने लोकशाहीचे महत्व पटवून दिले आहे. लोकशाही टिकविण्याचे श्रेय भारताला मिळाले आहे. राष्ट्राचे रक्षण करणे तसेच लोकशाही टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभाग दर्शविणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिह्यामध्ये पुन्हा नव्याने 22 हजार नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन माध्यमांतून ही मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया ही संपूर्ण वर्षभर सुरू असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदार यादीमध्ये आपले नाव नोंद करण्यासाठी पुढे येणे महत्वाचे आहे. कोणतीही निवडणूक आल्यानंतर मतदार यादीकडे लक्ष दिले जाते. मात्र तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. तत्पूर्वी ज्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांनी प्रत्येकाने आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी केले आहे.
मतदार नोंदणीमध्ये दिव्यांग मतदारांना अधिक प्राधान्य दिले आहे. थेट त्यांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रे जमा करुन त्यांची नावे नोंद करण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती देखील दर्शन एच. व्ही. यांनी सांगितले. स्वीप कार्यक्रम, मतदान जागृती, मतदार नोंदणीबाबत जागृती जिल्हा प्रशासनाच्यावतीने केली जात आहे. जिह्यामध्ये मतदान जागृती उपक्रम राबविल्याबद्दल जिह्याला सर्वोत्तम स्वीप कार्यक्षमता पुरस्कार देखील मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी म्हणाले, बेंगळूरनंतर सर्वात जास्त बेळगाव जिह्यामध्ये मतदारांची नोंद आहे. 38 लाख 80 हजार 378 मतदार आहेत. यापुढेही विविध प्रकारे जनजागृती करुन मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार नोंदणी जागृतीबाबत शाळा, महाविद्यालये यामध्ये निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या विजेत्या स्पर्धंकांना स्वीप समिती अध्यक्ष दर्शन एच. व्ही. यांच्या हस्ते तसेच इतर अधिकाऱयांच्या हस्ते बक्षी, वितरण करण्यात आले. याचबरोबर बुथ निहाय काम करणाऱया अधिकाऱयांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये नवीन मतदारांना त्यांचे मतदान कार्ड वितरण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, जिल्हा स्वीप समितीचे सेपेटरी परशुराम दुडगुंटी, जिल्हा शिक्षणाधिकारी विरेश नलतवाड, प्रसार माध्यमाचे उपसंचालक गुरूनाथ कडबुर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सुनिता देसाई यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.