मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरु आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही दिल्लीत असल्याने या चर्चांना उधाण आले आहे. परंतु या चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चंचला देवेंद्र फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुण्यात एका कार्यक्रमात आले असताना पत्रकारांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा संघटनात्मक बदल होणार नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.