ऑनलाईन टीम / पणजी
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी पाणी बिल थकबाकीवर व्याज आकारल्याबद्दल प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भरमसाठ पाणी बिलांवर चर्चेसाठी सावंत यांना थेट आव्हान दिले.”या महिन्यात आलेल्या अनेक बिलांवर मागील न भरलेल्या बिलांच्या थकबाकीवर व्याज आहे, अन्यथा 16000 लिटर पाणी मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बिले शून्य असायला हवी होती”अस पालेकर म्हणाले.
पालेकर यांनी साखळी मतदारसंघातील एका कुटुंबाला पाण्याचे बिल रु. 8753; ज्यापैकी रु. 2775 ही नवीन रक्कम आहे आणि रु. ५९१५ ही थकबाकी आहे. फुकट पाण्याच्या नावाखाली सरकार खोटारडेपणा पसरवत असल्याचे यावरून दिसून येते. गोवेकरांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर आयपीसी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असा युक्तिवाद पालेकर यांनी केला.
“अरविंद केजरीवाल यांच्या वीज हमी भावाचे अनुकरण करून सावंत सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गोवेकरांना १६,००० लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली. सप्टेंबर महिना आला, तसतसे अनेक गोवेकरांनी जास्त बिल आल्याच्या तक्रारी केल्या.
ऑक्टोबरमध्ये हे प्रकरण समोर आले. अनेकांना हजारो आणि लाखांमध्ये बिले मिळू लागल्याचे समोर आले गेल्या वर्षी ख्रिसमसच्या आदल्या दिवशी, सावंत यांनी तक्रार केली होती की सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या चुकांमुळे राज्यभरातील ग्राहकांना वाढीव पाणी बिले आली आहेत.
“यावरून स्पष्टपणे दिसून येते की प्रमोद सावंत एक कमकुवत आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, ज्यांना अद्याप चूक कोणी केली हे शोधू शकत नाही. कोविडमुळे अनेक गोवेकरांचे उत्पन्नाचे स्त्रोत गमावले असताना, सरकार त्यांच्याकडून पाण्याची भरमसाठ बिले भरण्याची अपेक्षा कशी करू शकते? थकबाकीवर व्याज पाठवताना सरकारला लाज वाटली पाहिजे,” अस ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “वाढलेले पाणी आणि वीज यामुळे लोक त्रस्त आहेत, आणि मुख्यमंत्री सावंत अनभिज्ञ आहेत. गोवेकरानी भाजपच्या खोट्या आश्वासनांना बळी पडणे थांबवावे आणि ‘आप’वर विश्वास दाखवावा जे प्रामाणिक प्रशासन देईल अस ते म्हणाले