शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुस्तक वितरण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना महामारीच्या संकटामुळे यावर्षी जूनमध्ये होणारा नव्या शैक्षणिक वर्षाचा मूर्हूत हुकला आहे. कोरोनाविरुध्द लढतानाही शासनस्तरावरून पुस्तक वितरणाचा मूहूर्त साधण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी युध्दपातळीवर शाळांपर्यंत पुस्तके पोचविण्याचे काम मागील आठवडय़ात प्रशासनस्तरावरून करण्यात आले होते. प्रतिवर्षाप्रमाणे 15 जूनचा शाळा सुरू होण्याचा मूहूर्त टळला टळला असला तरी शिक्षण सुरु व्हावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर पुस्तकाविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मोफत पाठयपुस्तके वितरण सुरू झाले आहे.
कोरोनामुळे यावर्षीचे विद्यार्थी वर्गाचे नव्या शैक्षणिक वर्षासमोरही चिंतेचे ढग निर्माण झालेले आहेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण शाळा सुरु होण्याआधी किंवा सुरू होताच विद्यार्थ्यांना आवश्यक पाठय़पुस्तके मिळतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आहेत. 1 लाख 31 हजार 409 विद्यार्थ्यांना 6 लाख 71 हजार 495 पाठपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. ही सर्व पाठय़पुस्तके त्या शाळास्तरावर पोच करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठय़पुस्तके दिली जातात. 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचा लाभ दिला जातो. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातील 1 लाख 31 हजार 409 विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन यापूर्वीचे केलेले होते. 6 लाख 71 हजार 495 इतक्या पाठय़पुस्तकांचे संच जिल्हा शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाले. लॉकडाऊन काळात ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तर गटशिक्षणाधिकाऱयांमार्फत केंद्रप्रमुखांकडे पुस्तक संचाच्<ाs वितरण करण्यात आले. त्यानंतर केंद्रस्तरावरून मुख्याध्यापकाकडे त्या त्या शाळांना ही पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षण विभागस्तरावरून नियोजन करण्यात आले होते. दरवर्षी 15 जून दरम्यान नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते. यादिवशी नवागतांचे मोठय़ा दिमाखात, उत्साहात स्वागत केले जाते. शाळा प्रवेशोत्सवच सर्व शाळातून साजरा होतो. पण कोरोनामुळे यावर्षीच्या शाळा प्रवेशोत्सवाचा मूर्हूत चुकला आहे. जुलै पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबात शासनाने कार्यक्रम आखला असला तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याबाबत अजूनही अनिश्चिता आहे. अशा परिस्थितीत शासनस्तरावरून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर त्यापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिक्षकवर्ग दक्षता घेऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठयपुस्तके त्यांच्या पालकांकडे सुर्पूद करण्यावर शिक्षकांनी भर दिला आहे. काही गावात त्यासाठी घरोघरी जाऊन विद्यार्थ्याच्या पालकांकडे पाठपुस्तकांचे वितरण केले जाऊ लागले आहे.