मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे मत : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार कोण?
वार्ताहर / कणकवली:
जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे पदाधिकारी व नेते एकमेकांवर आरोप-प्रत्त्यारोप करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात वाढणाऱया कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार कोण? प्रशासनाकडे निधी कमी पडत असल्याने गावागावातून निधी खर्च करून चाकरमान्यांची सोय केली पाहिजे. कारण हेच चाकरमानी इतर प्रसंगी मुंबईहून मदतकार्यात पुढाकार घेत असतात हे विसरून चालणार नाही, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी म्हटले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दाभोलकर म्हणतात, मुंबई-पुणे येथून चाकरमानी व अन्य लोकांच्या येण्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. म्हणजे गरज नसताना पोलीस आणि प्रशासनाचे नियम कडक होते आणि आता गरज असताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने सिंधुदुर्गात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. जिल्हय़ातील बहुसंख्य शहरांत बहुसंख्य दुकाने दिवसभर उघडी असतात. सर्वांना नियम सारखेच लावले पाहिजेत. बेजबाबदारीने वागणाऱयांना नगरपंचायत व पोलिसांनी नोटिसा देणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक तालुक्मयात 100 ते 200 दुचाकी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेषत: पोलिसांनी केवळ दुचाकीवाल्यांनाच टार्गेट केल्याचे दिसून आले. मात्र, ई पास व जीवनावश्यक वस्तू वाटपाचे शेकडो बोर्ड लावून लोक गाडय़ा घेऊन मुक्तपणे फिरत आहेत. होम क्वारंटाईन केलेले लोक व मुंबईहून आलेले चाकरमानी दिवसाढवळय़ा बाजारात खरेदीसाठी फिरतात. त्यातून कोरोनावर नियंत्रण कसे ठेवणार?
समन्वयाने काम आवश्यक
संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना योग्य सोयी-सुविधा पुरविण्यासाठी समन्वयाने काम आवश्यक आहे. नगरपंचायत, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस यांच्यात नियमांबाबतही एकवाक्मयता असल्याचे दिसत नाही. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्या संस्थात्मक जागेचे निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा गावपातळीवर नाही. त्याचा धोका संभवू शकतो. शाळा सुरू होण्याअगोदर मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने शाळा व परिसर निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे, असे दाभोलकर यांनी म्हटले आहे.