सध्याच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनात खाण्यापिण्याकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होत आहे. घरच्या अन्नापेक्षा बाजारात मिळणारे चवदार पण निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्याकडे कल वाढत आहे. यामुळे माणसाच्या रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होताना दिसतो. याशिवाय माणसाला आज अधिक काळ कामापासून दूर राहणे शक्मय नसल्याने काही आजार झाल्यास ताबडतोब शक्तीशाली अँटिबायोटिक्सचा मारा करून तत्काळ रोगनिवारण करण्याकडे कल दिसून येतो.
याचा परिणामही माणसाच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर होऊन ती कमी झालेली दिसून येते. सकस आहार नसल्यामुळे आणि पोषक द्रव्यांपेक्षा चवीला महत्त्व देऊन आहाराची निर्मिती होत असल्याने सेलेनियम या खनिजाची कमतरता शरीरात निर्माण झाली आहे. याचे घातक दुष्परिणाम दिसून येतात.
पशुंमध्ये मात्र रोगप्रतिकारशक्ती अखेरपर्यंत टिकून राहते, असा आजवरचा समज आहे. पशुंचा आहार हा प्रक्रियाकृत नसल्याने व तो नैसर्गिक स्वरुपातला असल्याने रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते, असे मानले जाते. तथापि, मानवासाठी उपयुक्त असणाऱया प्राण्यांमध्येही रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दुवासू राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. विशेषतः गायी, म्हशी, शेळय़ा-मेंढय़ा इत्यादी मोठय़ा प्रमाणावर आणि मोठय़ा संख्येने पाळल्या जाणाऱया पशुंमध्ये ही कमतरता दिसून येते. या प्राण्यांना गहू, चणा, इत्यादी धान्ये आहार म्हणून दिली जातात. यामुळेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे मानण्यात येते. त्यामुळे हे प्राणी कोणत्याही आजाराला लवकर बळी पडतात. दुधाचे उत्पादनही मंदावते. सेलेनियमचा डोस माणसांप्रमाणेच या प्राण्यांनाही द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय संशोधन केंद्रातही यासंबंधीचे संशोधन करण्यात आले. सेलेनियम हे खाणीत मिळणारे एक खनिज असून ते दुर्मीळ आहे. माणसाच्या अगर प्राण्यांच्या शरीरात ते क्षारांच्या स्वरुपात असते. आता पाळीव जनावरांच्या रोगप्रतिकारशक्तीचे संवर्धन करण्यासाठी सिलेनियमपासून औषधे बनविण्यावर संशोधन सुरू आहे.