जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते उद्घाटन : लाभ घेण्याचे शेतकऱयांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
खरीप हंगामासाठी फसल विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. शेतकऱयांच्या पिकासाठी ही फसल विमा योजना असून शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. संपूर्ण जिह्यात या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असून त्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक पावसामुळे किंवा पाऊस गेल्यामुळे पिकाचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळणे अवघड जाते. त्यासाठी पंतप्रधान फसल विमा योजना शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आली आहे. दरवषी ही योजना राबविली जाते. यावषीही या योजनेचा प्रारंभ झाला असून 31 जुलैपर्यंत शेतकऱयांनी आपल्या पिकांसाठी विमा भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामातील मूग पिकांसाठी 15 जुलैपर्यंत विमा भरावा तर इतर पिकांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत राहणार आहे. तरी शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱयांनी जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये किंवा कृषी साहाय्यक केंद्रामध्ये विमा भरावा, असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9964064451 आणि 6363921268 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.