ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील काही दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत.
ऐन निवडणुकीच्या काळात रंगलेल्या सत्तानाटय़ाच्या काळात भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती भाजपच्याच वरिष्ठ मंत्र्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिली होती. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते दिग्वजिय सिंह यांनीही या प्रकरणावर भाजपवर आरोप केले होते. या माहितीमध्ये तथ्य आढल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सायबर सेलला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.