ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील 27 हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच सौर उर्जा ग्रीड रेल्वे ट्रॅकचीही निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या, देशात पीपीपी तत्त्वानुसार 150 रेल्वे गाडय़ा चालविण्यात येतील. 148 कि. मी. बेंगळूर उपनगरीय रेल्वे यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 18 हजार 600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 25 टक्के रक्कम देईल. 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
2024 पर्यंत 6 हजार किमी हायवे तयार करण्याचे लक्ष्य आहे. 2500 किमी. एक्स्प्रेस हायवे आणि 9000 किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडोर उभारणार येणार आहे. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, चेन्नई-बेंगळूर एक्स्प्रेस लवकरच तयार होईल.