ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पीपीपी योजनेद्वारे 5 हजार शहरांची निर्मिती करणार येणार आहे. तसेच प्रत्येक जिह्यात निर्यात केंद्र उभारणार येणार असून, उत्पादनांच्या निर्यातीवर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी सीतारामन म्हणाल्या, यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तर पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील उत्पादनांवर भर देऊन त्याच्या निर्यातीकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘निर्वित’ योजना राबविण्यात येणार आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देशात तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार येणार आहे.
देशात गुतंवणूक सुरळीत व्हावी, यासाठी ‘इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल’ची स्थापना करण्यात येणार आहे. पीपीपी योजनेद्वारे 5 हजार शहरांची निर्मिती करुन इतर सर्व राज्यांना सोबत घेऊन स्मार्ट सिटी उभारण्याचा प्रयत्न असेल.