साहित्य : 3 बटाटे, 1 कांदा चिरून, 2 हिरवी मिरची उभी चिरून, 3 चमचे कोथिंबीर, 3 चमचे पुदिना, 4 केशरकाडय़ा दुधात भिजवून, 3 चमचे तेल अथवा तूप, मसालाः 1 तमालपत्र, 2 वेलची, 1 इंच दालचिनी, 4 लवंग, अर्धा चमचा शहाजिरं, 1 स्टारफूल, मॅरीनेटसाठीः पाव वाटी दही, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळदपूड, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, मीठ, भातासाठीः 1 चमचा तेल, दीड वाटी बासमती तांदूळ, 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 3 वेलची, पाव चमचा जिरं, मीठ
कृती : बटाटय़ाची साल काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत. गरम तेलात अथवा तुपात बटाटा तुकडे अर्धकच्चे परतवावेत. त्याच तेलात कांदा सोनेरी रंगावर परतवावा. बाऊलमध्ये मॅरीनेट साहित्यात बटाटा तुकडे मिक्स करून अर्धा तास ठेवावे. बासमती तांदूळ वीस मिनिटे भिजत ठेवून निथळावेत. गरम तेलात भातासाठी दिलेले साहित्य टाकावे. नंतर तांदूळ घालून अर्धकच्चा शिजवावा. बिर्याणीसाठी गरम तेलात मसाला दोन मिनिटे परतवून त्यात पहिला थर भात नंतर मॅरीनेट बटाटा पुन्हा भाताचा थर आणि शेवटी केशर, कोथिंबीर आणि पुदिना टाकून शिजवावे. आता तयार बिर्याणी रायत्यासोबत द्या.