दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा चित्रपट
अभिनेता वरुण धवनने स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. वरुणच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘बवाल’ असून साजिद नाडियाडवाला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडून त्याची निर्मिती केली जात आहे. वरुण धवनच्या या चित्रपटाच्या नायिकेचे नावही जाहीर करण्यात आले आहे. पहिल्यांदाच वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
बवाल पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारीसोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे वरुणने म्हटले आहे. वरुण धवन आणि जान्हवी यांनी यापूर्वी कुठल्याच चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. वरुण सध्या स्वतःच्या ‘भेडिया’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तर जान्हवी कपूर ‘मिस्टर अँड मिसेस माही’चे चित्रिकरण करत आहे.
नितेश तिवारी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. दंगल तसेच छिछोरे यासारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनप्रकरणी विक्रम रचला होता. तिवारी हे आता वरुण धवनसोबत पहिल्यांदाच चित्रपट करणार आहेत. याचमुळे वरुण धवन अत्यंत उत्सुक दिसून येतोय.