विद्यार्थ्यांना दिलासा, नवीन बसपाससाठी सेवा सिंधूचा आधार
बेळगाव / प्रतिनिधी
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली की परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. यंदा कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बराच काळ बंद होती. त्य़ामुळे बसपासच्या कामाला देखील स्थगिती मिळाली. मात्र आता शासनाने 9 महिन्याच्या कालावधीनंतर दहावी, बारावीचे वर्ग सुरू करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ते घर असा प्रवास करण्यासाठी बसपास गरजेचा आहे. मात्र यंदा बसपास प्रक्रिया बदलेली असल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळायला उशीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुन्या बसपासची मुदत आता पुन्हा एकदा 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे बंद असलेली पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली. दरम्यान परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 10 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. आता शासनाने दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्याबरोबर सहावी सातवी इत्ततेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम कार्यक्रम सुरू केला त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी बसपास गरजेचा आहे. बसपासच्या आधारे प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे. यंदा कोरोनामुळे शाळा उशीराने सुरू झाल्याने बसपास प्रक्रिया उशीराने सुरू झाली आहे. त्यातच यंदा बसपास प्रक्रियेचे स्वरूप बदलण्यात आले आहे.
बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा सिंधू चा आधार घेऊन अर्ज करावा लागणार आहे. विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, पदवी, वैद्यकीय अभियांत्रिकी, डिप्लोमा महाविद्यालयाबरोबर आता दहावी बारावीचे वर्ग सुरू झाल्याने बसपाच्या मागणी वाढ झाली आहे. मात्र यंदा ऑनलाईन प्रक्रियेला बसपास उपलब्ध व्हायला उशीर होणार आहे. त्यामुळे परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शाळा व महाविद्यालयांनी दिलेली शुल्क पावती, आधार कार्ड आणि मागील वर्षी वितरीत केलेले पास दाखवून प्रवास करता येणार आहे.
माध्यमिक शाळेतील सामान्य विद्यार्थ्यांना 750 रूपयात तर विद्यार्थिंनीना 150 रूपयांत बसपास मिळणार आहे. अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत बसपासचे वितरण करण्यात येणार आहे. सामान्य वर्गातील पदवी, पदव्युत्तर, व डिप्लोमा विद्यार्थ्यांना 1050 रूपये तर अनुसूचित जाती जमातेच्या विद्यार्थ्यांना 150 रूपये, आयटीआय सामान्य विद्यार्थी, 1310 रूपये, तर अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांकडून 160 रूपये, क्यावसायिक अभ्यासक्रमातील सामान्य विद्यार्थ्यांना 1550 रूपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी 150 रूपये याप्रमाणे बसपासचे दर आहेत.