अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 9 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.30
● मंगळवारी 218 बाधित
● सर्व तालुके दोन आकडी
● जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 8.17 टक्के
सातारा / प्रतिनिधी :
राज्यात कोरोनाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपुष्टात येईल, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही कोरोना संसर्ग प्रकरणे कमी होत आहेत. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 218 बाधित आले आहेत. संसर्ग नियंत्रणात आल्याने सद्यस्थितीत असलेले निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 8.17 वर
सातारा जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याचा दिलासा मिळत आहे. मंगळवारी रात्रीच्या अहवालात हा दर 8.17 टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग उतरणीला लागल्याचे दिसत आहे.
सर्व तालुके दोन आकडी
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात वाढ दोन आकडी झाली आहे. कालच्या अहवालात सातारा 63, कराड 33 हे दोन तालुके सर्वाधिक आहेत. अन्य तालुक्यांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी
नमुने-2669
बाधित-218
बुधवारपर्यंत
नमुने-25,20,838
बाधित-2,78,557
मृत्यू-6,629
मुक्त-2,66,679