प्रतिनिधी / बार्शी
तुळजापूर रस्त्यावर बावी (आ) येथील प्रवेशद्वाराजवळ एका कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महेश भारत डोळज (२७ वर्षे) रा वैराग, विकास सुग्रीव वाळके ( ३२) रा. मानेगाव, दिपक संग्राम घोलप (३२) वर्षे रा दडशिंगे अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. याबाबत माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काळात खाजगी कमानीचे काम कसे सुरु होते, तसेच झालेल्या घटनेला जबाबदार कोन व बार्शी तालुका पोलिस यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.
बार्शी तालुक्यात अनेक गावांत अशी विना परवाना बांधकाम चालू आहेत. या विषयी प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.