सोलापूर /प्रतिनिधी
लातूर – मतदारसंघात होणार्या मनरेगातून गावाच्या विकास कामासाठी गावात एकोपा राहण्यासाठी कोरोना काळात प्रशासनावरील तणाव अधिक वाढू नये व निवडणूक खर्चाची बचत व्हावी या उद्देशाने औसा विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीला आमदार अथवा इतर निधीतून 21 लाख रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.
मतदारसंघात मनरेगातून गावाचा विकास करणार्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून 21 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली असताना आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आणखी एक मोठी घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी करित मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीची बिनविरोध होईल आशा ग्रामपंचायतीला 21 लाख रूपयांचा निधी आमदार अथवा इतर निधीतून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.एकंदरीत गावाच्या विकासासाठी हि एक मोठी संधी आ. अभिमन्यू पवार यांनी निर्माण करुन दिली आहे. यामुळे बिनविरोध ग्रामपंचायतीच्या गावातील विकास कामाला यामुळे गती मिळणार आहे.राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.यामध्ये 15 जानेवारी रोजी मतदानही होणार आहे.या अनुषंगाने औसा विधानसभा मतदारसंघात मनरेगा अंतर्गत होणार्या कामाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहेत.यामध्येे मनरेगातून गावातील विकास कामे व नकाशावरील शेतरस्ते मोकळे करण्यासाठी गावात एकवाक्यता आवश्यक असताना ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नाही म्हणलं तरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावाच्या एकोप्यावर थोडा फार परिणाम होतोच अशात मनरेगातून ग्रामविकासाच्या प्रयत्नांना खीळ बसु नये कोरोना काळात व्यस्त असलेल्या प्रशासनावर कामाचा अधिक ताण पडू नये व निवडणूक खर्चाची बचत व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी हा निर्णय घेतला असून ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होतील त्या गावांना शासनाचे वेगळे बक्षीस मिळणार आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी घोषित केलेला निधीचा समावेश अभिसरणात केला तर दुप्पट निधी उपलब्ध होऊन गावातील अपेक्षित विकास कामे होणार आहे.याबाबत विकासाचे हे धोरण नागरिकांना सांगण्यासाठी आ. अभिमन्यू पवार हे मतदारसंघातील निवडणूका होणार्या काही गावांचे दौरे करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करणार आहेत. आमदारांनी टाकलेले हे पाऊल निश्चित गाव विकासाच्या दृष्टीने फलदायी ठरणारे असून त्या दृष्टीने ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.