उद्योग खात्री योजनेतून काम देण्यात खानापूर तालुका अव्वल : बेळगाव तालुक्यात 7 हजार 343 जणांना काम, कागवाड पिछाडीवर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे अनेक जणांनी घरीच राहणे पसंत केले आहे. अशा परिस्थितीत त्याचा फैलाव होवू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र उद्योग खात्री योजनेला चालना देण्यात आली आहे. आपापल्या जबाबदारीवर ही कामे देण्यात येत असून बुधवारी जिल्हय़ात 78 हजार 732 जणांना काम देण्यात आले आहे. सर्वात अधिक खानापूर तालुक्मयात कामगारांना काम देण्यात आले असून सर्वात कमी कागवाड तालुक्मयात काम देण्यात आले आहेत.
खानापूर तालुक्मयात सुमारे 11 हजार 217 जणांना बुधवारी काम देण्यात आले आहे तर कागवाड तालुक्मयात केवळ 693 जणांना काम देण्यात आले आहे. तर बेळगाव तालुक्मयात 7 हजार 343 जणांना काम देण्यात आले आहे. याचबरोबर सर्वच तालुक्मयांतून उद्योग खात्रीचे काम देण्यात आले आहे. कोरोना काळात काही काळ उद्योग खात्रीचे काम बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेवून ही कामे बंद ठेवण्यात आली होती.
अनेकांवर उपासमारीची वेळ येत असल्याने सरकारने ही कामे आपापल्या जबाबदारीवर आणि कोरोनाचे नियम पाळत करावीत, असे आवाहन केले होते. त्यामुळे आता जिल्हय़ात कामगारांना दररोज काम मिळत आहे. बेळगाव तालुका उद्योग खात्रीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर असला तरी सध्या खानापूर तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात कामगारांना काम देण्यात येत आहे. याचबरोबर बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यामुळे उद्योग खात्री योजनेतून अनेकांना पसंती देण्यात आली आहे. तर राज्यात उद्योग खात्रीतून काम देण्यात बेळगाव तालुका अव्वल आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग खात्रीची कामे मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहेत.
बेळगाव जिल्हय़ात दररोज सुमारे 75 हजार कामगारांना कामे देण्यात आली आहेत. याचबरोबर उद्योग खात्रीतून अजूनही कामे देण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे. बेळगाव जिल्हय़ात अनेक भागांमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. उद्योग खात्रीतून वन खात्यामधील वृक्षारोपणासाठी लागणारे खड्डेदेखील खोदण्यात आले आहेत. तर छोटेखानी धरणे व इतर कामांना चालना देण्यात आली आहे.
कामे देण्यात येत असल्याने समाधान
उद्योग खात्रीतून सध्या अनेक तलाव तसेच नाल्यांची खोदाई करण्यावर भर देण्यात आला आहे. परिणामी याचा फायदा आता शेतकऱयांना होत आहे. कोरोना काळातही दररोज 75 हजार कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही अधिक कामगारांना काम देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत असून यासाठी तातडीने पावले उचलण्यात येणार आहेत. उद्योग खात्रीतून वन विभागातील आखत्यारित अनेक भागांत छोटेखानी तलाव बांधण्यात आले आहेत. जिल्हय़ातील डोंगराळ भागातील पाणी जमिनीत मुरावे व पाणी पातळी वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या उद्योग खात्रीतून कामे देण्यात येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुकानिहाय कामगारांना देण्यात आलेली कामे
तालुका | बुधवारी कामगारांची संख्या |
अथणी | 4397 |
बेळगाव | 7343 |
बैलहोंगल | 2632 |
चिकोडी | 6710 |
गोकाक | 6890 |
हुक्केरी | 10684 |
कागवाड | 693 |
खानापूर | 11217 |
कित्तूर | 1744 |
मुडलगी | 2280 |
निपाणी | 4063 |
रामदुर्ग | 5933 |
रायबाग | 6770 |
सौंदत्ती | 7376 |
एकूण | 78732 |