बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दररोज बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. दरम्यान लॉकडाऊन नंतर बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यात लॉकडाउनच्या आधी २५ ते ३० हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. शनिवारी जिल्ह्यात ८,२१४ नवीन रुग्णांची भर पडली. लॉकडाऊन लागू होण्याआधीची परिस्थिती पाहता बेंगळूरमध्ये पॉझिटिव्ह संख्येत दिलासादायी घट होत आहे.
दरम्यान, राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. राज्य सरकारने १० मे २४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू केला होता. परत हा लॉकडाऊन वाढवून ७ जून पर्यंत केला आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन यशस्वी होत असल्याचं बोललं जातंय. बेंगळूरमध्येही लॉकडाऊनचा परिणाम दिसत आहे. कोरोना संक्रमांचे प्रमाण कमी होत आहे. परंतु शहरात कोविड उपचारासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने चिंता कायम आहे.
राज्यात सामान्य रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड मिळविताना त्रास होत आहे. परंतु व्हीआयपी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींसाठी आयसीयू बेड लगेच उपलब्ध होत आहेत. परंतु सर्वसामान्य लोकांना बेड उपलब्ध होण्यापासून उपचारापर्यंत प्रितिक्षा करावी लागत आहे. एकत्र प्रतिबंधित करीत आहे.
बीबीएमपीने शहरातील सरकारी कोटीतून कोविड रूग्णांना ५८७ आयसीयू आणि ५९७ आयसीयू व्हेंटिलेटर बेड दिले आले आहेत. एप्रिलच्या शेवटच्या काही दिवसांपर्यंत आयसीयू बेड उपलब्ध होते, जोपर्यंत दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत नव्हती तो पर्यंत बेड उपलब्ध होत होते. अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे अवघड झाले.शनिवारी इंद्रधनुष्य रुग्णालयात २० आयसीयू बेड उपलब्ध करून दिले आहेत. परंतु सर्व बेड मुलांसाठी आरक्षित आहेत.
खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम ’असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रसन्ना एच. एम यांनी मान्य केले की सामान्य बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही आयसीयू आणि आयसीयू-व्हेंटिलेटर बेडची तीव्र टंचाई भासत आहे.