शेतकऱयांसमोर चाऱयाचा प्रश्न : भरपाईची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे येथील शेतवडीत साठवून ठेवलेल्या गवतगंजीला अज्ञातांनी आग लावल्याने सुमारे दोन ट्रॉल्या पिंजर जळून खाक झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे भारत भडांगे या शेतकऱयाला पंधरा ते वीस हजारांचा फटका बसला आहे.
बेकिनकेरे-अगसगे मार्गावर भडांगे कुटुंबीयांनी शेतातील भाताची मळणी करून एकाच ठिकाणी पिंजराची साठवणूक केली होती. मात्र, शनिवारी अज्ञातांनी लावलेल्या आगीत संपूर्ण गवतगंजीच जळून खाक झाल्याने भडांगे कुटुंबीयांसमोर चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतवडीकडे जाणाऱया काही शेतकऱयांना गवतगंजीला आग लागल्याचे निदर्शनास आले.
ही वार्ता गावात समजेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्याने काही मिनिटातच गवतगंजी पूर्णपणे जळून खाक झाली. संबंधित खात्याने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत
आहे.
दरवषी उन्हाळय़ाला सुरुवात झाली की गवतगंजींना आग लागण्याच्या प्रकारात वाढ होत असते. यामुळे शेकडो शेतकऱयांचे दरवषी नुकसान होत असते. याकरिता कृषी खाते व प्रशासनाने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.