ग्रामस्थांचे आरोग्य धोक्मयात, स्वच्छतेकडे ग्राम पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे गावात मागील काही दिवसांपासून तुंबलेल्या गटारींकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने गावात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत ग्राम पंचायतीकडे तक्रार करून देखील याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या दुर्गंधीने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावातील गटारींची मागील काही दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटारी तुडूंब भरून आहे. त्यात वळिवाच्या पावसाने गटारींतील घाण गल्लीत पसरली आहे. तसेच गटारींत कचरा साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे देखील ग्रामस्थांना मुष्कील बनले आहे. दरम्यान डासांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे लहान बालकांना गल्लीत खेळणे देखील अवघड झाले आहे. नागनाथ गल्लीतून नागनाथ मंदिराकडे जाणाऱया मार्गावरील गटारी कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी गटारीत साचून आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गल्लीतून जाताना नाक मुठीत धरूनच जावे लागत आहे. अनेकवेळा याबाबत ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष व सदस्यांना देखील माहिती देण्यात आली आहे. त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावात गल्लोगल्ली गटारी तुंबल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान गटारींची बांधणी व्यवस्थित नसल्याने सांडपाणी साचून आहे. गटारीत कचरा, माती, गवत, प्लास्टिक साचून राहिल्याने गटारींची दुर्दशा झाली आहे. परिणामी गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने समस्येत भर पडत आहे. ग्राम पंचायतीने तातडीने लक्ष देऊन गटारीची स्वच्छ करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरून आहे.