महात्मा गांधी रोहयोत बेळगाव जिल्हा अग्रस्थानी
प्रतिनिधी / बेळगाव
महात्मा गांधी उद्योगखात्री योजना जिह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सरकारने परिश्रम घेतले आहेत. राज्यात बेळगाव जिल्हा अग्रस्थानी आला आहे. त्यामुळे सरकारकडून या जिह्याचे विशेष अभिनंदनही करण्यात आले आहे. विशेष करून बेळगाव तालुक्मयात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विविध विभागातून ही कामे पूर्ण झाली तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. त्याला प्रतिसादही मोठय़ा प्रमाणात मिळू लागला आहे.
विकासाबरोबरच बेरोजगारी दूर करण्यासाठी महत्मा गांधी उद्योग खात्री योजनेला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारची 50 टक्के रक्कम तर राज्य सरकारची 50 टक्के रक्कम समाविष्ट असते. यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून मिळणाऱया निधीचा विनियोग करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. या योजनेतून नदी-नाल्यांतील गाळ काढणे याचबरोबर विहिरी खोदाई, तलावांची खोदाई यासह इतर कामे करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेलाही उद्योग मिळावा हा उद्देश असला तरी यामधून विकास होत आहे.
विविध गावांमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तलावांची दुरुस्ती करण्यात आली. ही योजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आली. महिलांना काम देण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. बेरोजगारांना काम देण्यात आले. ही योजना राबविण्यासाठी ग्राम पंचायतींना उद्दिष्टही देण्यात आले आहे. काही ग्राम पंचायतींनी उद्दिष्ट पूर्ण केले नसले तरी बहुसंख्य ग्राम पंचायतींनी ही योजना 100 टक्के राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे बेळगाव तालुका पहिल्या क्रमांकावर आला आहे. बेळगाव तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात उद्योग खात्री योजनेंतर्गत कामे राबवून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्रा.पं.बरोबरच फलोत्पादन खाते, पशुवैद्यकीय खाते, वनखाते कृषी विभागासाठीही ही योजना फायदेशीर ठरली आहे. या योजनेमधून शेतकऱयांनी विहिरी खोदाई करून घेतल्या आहेत. यापूर्वीही म्हणजे 2017 मध्ये जिल्हय़ात तब्बल 305 कोटी 65 लाख 77 हजार रुपयांचे काम झाले होते. यावषीही तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात काम करण्यात आले असून कोटय़वधी कामांची नोंद झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.