नंदिहळ्ळीसह परिसरातील ग्रामस्थ-शेतकऱयांचा मोर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग हा सुपीक जमिनीतून करण्यात येणार आहे. यापूर्वी त्याला तीव्र विरोध करण्यात आला होता. तरीदेखील पुन्हा हा रेल्वेमार्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे नंदिहळ्ळीसह परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना सोमवारी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, देसूर, गजपती यासह इतर परिसरातील सुपीक शेतजमीन या रेल्वेमार्गामध्ये जाणार आहे. वास्तविक हा रेल्वेमार्ग माळवट जमिनीतून करणे गरजेचे होते. मात्र, शेतकऱयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नंदिहळ्ळीसह परिसरातील सुपीक जमीन या रेल्वेमार्गामध्ये जाणार असल्याने शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे संघटितपणे रेल्वेमार्गाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असून शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.