वारकऱयांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ : विविध गावांतून 25 पासून दिंडय़ा रवाना
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्रातील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दिंडी सोहळय़ांना प्रारंभ होत आहे. 20 जूनला देहूमधून संत तुकाराम महाराजांची तर 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. या पाठोपाठ बेळगाव आणि परिसरातील पायी दिंडय़ा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातून दरवषी 10 ते 15 दिंडय़ा मार्गस्थ होतात. कोरोनामुळे दिंडय़ांना ब्रेक लागला होता. यंदा सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने दिंडय़ांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव परिसरातून बेळगाव शहर, कसबा नंदगड, कणबर्गी, निलजी, केदनूर, आंबेवाडी, सुळगा, कंग्राळी खुर्द, सांबरा आदी ठिकाणांहून पायी दिंडय़ा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यापैकी कसबा नंदगड येथील पायी दिंडी रविवारी मार्गस्थ झाली. त्यापाठोपाठ 25 जून रोजी निलजी येथील पायी दिंडी रवाना होणार आहे. कणबर्गी, कंग्राळी खुर्द आणि आंबेवाडी येथील पायी दिंडी 28 रोजी निघणार आहे.
हातात पताका, डोक्मयावर कळशी घेऊन टाळमृदंगाच्या गजरात भजन-कीर्तनात तल्लीन होऊन वारकरी दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. मागील दोन वर्षात आषाढी वारीत खंड पडल्यामुळे दिंडय़ा औपचारिकरीत्या झाल्या होत्या. त्यामुळे वारकऱयांना माहेरची ओढ लागावी तशी पायी दिंडीची यंदा ओढ लागली आहे.
दोन वर्षात एकादशीचा सोहळा केवळ प्रतिकात्मक रूपात साजरा झाला होता. त्यामुळे वारकऱयांना विठुरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, यंदा प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन होणार असल्याने वारकऱयांना आस लागली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाव शहरासह ग्रामीण भागातून पायी दिंडय़ा मार्गस्थ होणार आहेत. या दिंडय़ांमध्ये साधारण 200 ते 250 वारकरी विठुनामाचा गजर करत रवाना होणार आहेत.
दोन वर्षात केवळ मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. मात्र, यंदा सर्व दिंडय़ा पूर्ववतपणे निघणार आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
भगवंताचे दर्शन होणार
मागील 27 वर्षांपासून अखंडपणे दिंडी मार्गस्थ होत आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे खंड पडला होता. त्यामुळे भगवंताचे दर्शन झाले नाही. ‘भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था भक्तांची झाली आहे. दोन वर्षांनंतर यंदा भगवंताचे दर्शन होणार असल्याने विठुरायाची ओढ लागली
आहे.
– निंगोजी पाटील, दिंडीचालक, कंग्राळी खुर्द
पायी दिंडीसाठी वडगावचे वारकरी आळंदीकडे मार्गस्थ
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मंगळवार दि. 21 जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या दिंडी सोहळय़ात सहभागी होण्यासाठी वडगाव येथील वारकरी शनिवारी बेळगाव येथून आळंदीकडे रवाना झाले.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा दिंडी सोहळा होत असल्याने वारकरी संप्रदायामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहर परिसरातून हजारो वारकरी दिंडी सोहळय़ामध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारी वडगाव येथील शेकडो भक्त आळंदी दिंडीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
वडगाव येथील संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळ गेल्या 22 वर्षांपासून पायी वारीत सहभागी होत आहे. कोरोनामुळे वारीत खंड पडला. मात्र, यंदा प्रत्यक्ष पुन्हा वारीत सहभागी होता येणार आहे. ग्रामदेवता श्री मंगाईदेवीचे पूजन करण्यात आले. हभप शशिकांत धामणेकर व हभप मंगेश नागोजीचे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव परिसरातील 70 हून अधिक वारकरी पंढरपूरमार्गे आळंदीकडे रवाना झाले. आळंदी येथे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर पालखी सोहळय़ात ते सहभागी होणार आहेत.