सीएआरचा पोलीस संशयाच्या भोवऱयात, महिन्याभरापूर्वी का सोडून दिले?
प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस भरतीसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत बेळगाव येथे चार बोगस परीक्षार्थींना अटक करण्यता आली आहे. गेल्या महिन्यात दुसऱयाच्या नावे परीक्षा लिहिताना रंगेहात पकडण्यात आलेला सीएआरचा पोलीस सध्या संशयाच्या भोवऱयात अडकला असून त्याला कोणी व का सोडून दिले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवारी भीमशी महादेव हुल्लोळी (वय 24) रा. हडगीनहाळ, ता. गोकाक, सुरेश लक्ष्मण कडबी (वय 25) रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक, आनंद हणमंत वडेयर (वय 28) रा. उदगट्टी, ता. गोकाक, मेहबूब बाबासाब अक्किवाट (वय 23) रा. उदगट्टी, ता. गोकाक यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी तिघा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी भीमशी हुल्लोळी याला चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेतले आहे.
एकीकडे गोकाक तालुक्मयातील या टोळीच्या म्होरक्मयाचा शोध सुरू असतानाच बेळगाव येथे सेवा बजाविणाऱया व बोगस परीक्षार्थींना फूस देत स्वतःही दुसऱयाच्या नावे परीक्षा लिहिणाऱया सीएआरच्या जवानाचा या प्रकरणात सहभाग किती आहे? याचीही चौकशी करण्याची गरज आहे. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिल्याने एकच खळबळ माजली आहे.
बेंगळूर, हुबळी, बळ्ळारी, चित्रदुर्ग येथेही पोलीस भरतीसाठी झालेल्या सीईटी परीक्षेत बोगस परीक्षार्थींना अटक झाली आहे. हुबळी पोलिसांनी तर अंकलगी पोलीस स्थानकातील अडव्याप्पा यडगुद्री या पोलिसालाच अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यात अटक झालेले बोगस परीक्षार्थी गोकाक तालुक्मयातील आहेत.
मुडलगी परिसरातील टोळीच्या म्होरक्मयाचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक पोलीस यासाठी कामाला लागले आहेत. बेळगाव पोलिसांनीही चौकशी हाती घेतली आहे. भीमशी हुल्लोळी या तरुणाला पोलीस कोठडीत घेवून त्याची चौकशी करण्यात येत असून गोकाक तालुक्मयात बोगस परीक्षार्थींचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्मयता आहे.
18 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील एका परीक्षा केंद्रावर दुसऱयाच्या नावे परीक्षा देताना सीएआरमधील एका जवानाला रंगेहात पकडण्यात आले होते. त्याला त्याच दिवशी अटक झाली असती तर रविवारी एकाच्या नावे दुसरे परीक्षा लिहिण्याचे धाडस कोणी केले नसते. पोलिसांनी त्याला मोकाट सोडल्याने केवळ महिन्याभरात त्याने संपूर्ण राज्यभरात आपले जाळे वाढविल्याची माहिती उघडकीस आली असून आता तरी त्याला अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.