श्रीराम सेना हिंदुस्थानची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणुका झाल्या, विविध प्रकारचे मेळावे झाले, त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, हिंदूंची मंदिरेच का बंद? असा प्रश्न विचारत तातडीने सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली करा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे यावषी लॉकडाऊन करण्यात आले. विविध मंदिरांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली.कार्यक्रमांवरही निर्बंध घातले. मात्र, कोरोना आता कमी झाला असून सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे भक्तांसाठी खुली केली आहेत. मात्र, कर्नाटकातील सौंदत्ती यल्लम्मा देवी, मायाक्का चिंचली ही सर्व प्रसिद्ध मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे भक्तांना दर्शन मिळणे कठीण झाले आहे. आता निवडणुका झाल्या, मेळावे झाले. त्यांना बिनशर्त परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरांनाच का नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच ‘तांडव’ या वेबसीरीजमध्ये हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. त्या वेबसीरीजवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, संतोष अक्कतंगेरहाळ, सचिन पाटील, श्रीकांत कुरिहाळकर, राहुल बडसकर, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.