प्राणीप्रेमी सामाजिक संघटनांनीच पुढाकार घेणे आवश्यक : केरळ न्यायालयाचे निरीक्षण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्मया जनावरांची आणि कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे. दिवसेंदिवस भटक्मया जनावरांची संख्या बिकट बनत चालली आहे. याबाबत केरळ राज्यात एका याचिकेवर न्यायालयाने भटक्मया जनावरांना खाऊ घालणाऱयांनी जनावरांची पुढील जबाबदारी घ्यावी, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे भटक्मया जनावरांना अन्न द्यायचे की नाही? असा प्रश्न प्राणीप्रेमींतून उपस्थित झाला आहे.
शहरात भटक्मया जनावरांना चपाती, बिस्कीट आणि इतर खाद्यपदार्थ दिले जातात. त्यामुळे भटक्मया जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. भटकी कुत्री आणि जनावरे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा अडथळा ठरत आहेत. शिवाय भटक्मया कुत्र्यांनी माणसांवर हल्ला करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्मया जनावरांना आळा घालण्यासाठी मनपामार्फत मोहीम राबविली जाते. शिवाय कुत्र्यांची नसबंदी केली जाते. मात्र या मोहिमेमध्ये सातत्य नसल्याने भटक्मया जनावरांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे.
खाद्य देणाऱयांनीच ‘त्या’ जनावरांची जबाबदारी घ्यावी
दरम्यान अनेक संस्था, व्यक्ती दररोज अशा जनावरांना खाद्य देतात. त्यामुळे जनावरांमध्ये आणखी भरच पडत आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधून न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने भटक्मया जनावरांना जे अन्न-खाद्य देतात त्यांनीच त्या जनावरांची जबाबदारी घ्यावी, असे म्हटले आहे. यामुळे प्राणीप्रेमी, संस्था आणि व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान जनावरांना खायला न दिल्यास ती हिंसक होऊन माणसांच्या अंगावर धावून जातील, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
खायला न घातल्यासही धोका
भटक्मया जनावरांना खायला घालणे म्हणजेच त्यांना सवय लावण्यासारखे आहे. पण अचानक खायला न घातल्यास ती आक्रमक होऊन एकमेकांवर हल्ला करतात. शिवाय शहरातील चिकन-मटण आणि कचराकुंडय़ांवर कुत्र्यांची संख्या वाढू शकते. तसेच शेळय़ा, कोंबडय़ांवर भटक्मया कुत्र्यांचे हल्ले वाढू शकतात.
– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)
नसबंदी मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे
कोणत्याही प्राण्याला त्रास दिला तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भटक्मया कुत्र्यांना कोणतीही संस्था किंवा व्यक्ती सांभाळू शकत नाही. यासाठी नसबंदी मोहीम गतीने आणि सातत्याने राबविणे आवश्यक आहे.
– विनायक केसरकर (हा माझा धर्म पशु बचाव दल)