प्रतिनिधी/ खेड
खेड-भडगाव मार्गावरील क्षेत्रपालनजीकच्या गटारात सर्रासपणे टाकल्या जाणाऱया कचऱयामुळे मार्गावर कचऱयाचे ढिग साचत आहे. गटारात साचलेल्या कचऱयामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असून पाण्यात कुजलेल्या कचऱयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. याठिकाणी कचरा टाकण्यास अटकाव का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या मार्गावर वाहनांसह पादचाऱयांची सतत वर्दळ सुरू असते. नागरिकांच्या रहदारीने हा मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. शहरात दैनंदिन कामकाजासह मोलमजुरीसाठी येणारे नागरिक व महिलादेखील याच मार्गाचा वापर करत असतात. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भडगाव येथील मुख्य मार्गालगतच कचरा टाकण्यात येत आहे. याठिकाणी टाकण्यात येणाऱया कचऱयामुळे डम्पिंग ग्राऊंड निर्माण होते की काय अशी शंकादेखील नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
कचऱयामुळे गटाऱयातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे. याच पाण्यात कचरा कुजत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचमुळे मार्गावरून ये-जा करणाऱया ग्रामस्थांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर धोक्याच टांगती तलवार कायम आहे. याठिकाणी कचरा टाकण्यास ग्रामपंचायतीने अटकाव करणे नितांत गरजेचे आहे.