विवाहासाठी गुण मिलन किंवा सायवळ बघण्याआधी…
नमस्कार, विवाह हा हिंदू धर्मातल्या 16 संस्कारातील महत्त्वाचा संस्कार आहे. यात वंश वृद्धी आणि आयुष्याची साथ हा उद्देश असतो. म्हणूनच त्याला लग्नाची रेशीमगाठ असे म्हटले जाते. 7 फेरे, सप्तपदी आणि 7 वचन देऊन साता जन्माची साथ देण्याची शपथ घेतलेले नव्याची नवलाई संपल्यानंतर सात तास तरी एकत्र राहतील का अशी शंका आहे. आज-कालच्या जमान्यामध्ये जिथे ओपन मॅरेज (लग्नानंतर एकमेकांच्या संमतीने खुलेआम परपुरुषाशी किंवा परस्त्रीशी संबंध ठेवणे) लिव इन रिलेशनशिप (लग्नाशिवाय एकत्र राहणे) हे सर्व मान्य होत आहे तिथे विवाह संस्था किती काळ टिकेल याची खात्री नाही. असो, इतर कुठल्याही संस्कृतीत नसलेली एक पद्धत आपल्या ऋषी-मुनींनी वरदान स्वरूप आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे विवाहासाठी अष्टकूट मिलान किंवा गुणमिलन. यामध्ये वर्णपासून ते नाडीपर्यंत आठ भागात वर वधूला किती गुण मिळतात हे पाहिले जाते. पारंपरिक गुणमिलन कसे असते हे थोडक्मयात समजून घेऊया. यामध्ये आठ श्रेणी आहेत प्रत्येक श्रेणीला चढत्या क्रमाने गुण आहेत. 1. वर्ण-स्वाभिमान-एक गुण 2. वश्य-भावनात्मक संबंध-दोन गुण 3. तारा-भाग्याची साथ-तीन गुण 4. योनी-शरीर सुख, सुखाची प्रवृत्ती-चार गुण 5. ग्रहमैत्री-स्वभाव मिलन-पाच गुण 6. गण-प्राकृतिक मेळ-सहा गुण 7. भुकूट-चंद्र राशी मिलन-सात गुण 8. नाडी- स्वास्थ्य-आठ गुण. म्हणजे एकूण 36 गुणांपैकी किती गुण जमले यावरून विवाह करायचा की नाही हे ठरवले जाते. 18 ते 24 गुण जमत असतील तर साधारण गुण जमतात, 25 ते 30 जमत असतील तर चांगले गुण जमतात आणि 30च्यावर गुण जमत असतील तर वधूवरांची पत्रिका उत्तम जुळते असे मानले जाते. यामध्ये षडाष्टक, एक नाडी दोष आणि मंगळ विचार (याबद्दल स्वतंत्र लेख लिहिण्याचा मानस आहे) महत्त्वाचा मानला जातो. याबद्दलची माहिती सविस्तरपणे दाते पंचांगात पान क्रमांक 10 आणि 11 वर दिलेली आहे. आज-काल बरेच लोक इंटरनेटवर किती गुण जमत आहेत हे बघतात आणि विवाहासाठी निर्णय घेतात, हे अत्यंत चुकीचे आहे. जाणकार ज्योतिषाला दोन्ही पत्रिका दाखवून मगच निर्णय घेणे योग्य ठरते. अर्थात ऋषीमुनींनी दिलेली ही पद्धत चुकीची आहे असे माझे म्हणणे नाही पण काळानुरूप आपण या पद्धतीमध्ये फरकसुद्धा केला पाहिजे. विवाहापूर्वी वरवधूची वैद्यकीय चाचणीसुद्धा व्हायला हवी. यामध्ये कुठला आनुवंशिक आजार आहे का, शारीरिक क्षमता योग्य आहे की नाही हे मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर पत्रिका जुळवताना खालील गोष्टींचा अंतर्भाव करायला हवा असे मला वाटते. बघा पटते का. 1 आयुर्मर्यादा-वर-वधूचे साधारण आयुष्य किती असेल याचा अंदाज पत्रिकेवरून घेता येऊ शकतो. एकाचे आयुष्य दीर्घ आहे आणि दुसऱयाचे कमी असेल तर असा विवाह जुळवणे योग्य आहे का? 2. शारीरिक सौख्य-विवाह करण्यामागे आधारभूत कारण म्हणजे शरीरसुख. आज पुरुष आणि स्त्री याबरोबरच इतर लिंगांचाही विचार केला जातो. समलैंगिक संबंध, LGBTQI हा काही टॅबू किंवा विचित्र/निषिध्ध विषय राहिलेला नाही. पण हे लपवून ठेवल्याने विवाह मोडल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. वैद्यकीय तपासणी बरोबर पत्रिकेवरूनही अंदाज येऊ शकतो की वर किंवा वधूचे लैंगिक वर्तन कसे असेल, ते एकमेकास अनुरूप आहेत का? 3.संतती-प्रजोत्पादन हा विवाहसंस्थेचा मूळ गाभा आहे. अर्थात आज-काल कितीतरी जोडपी जाणून बुजून संतती न उत्पन्न करण्याचा निर्णय घेतात. पण संततीच्या दृष्टीने दोघांचीही पत्रिका कशी आहे हे पाहणेही गरजेचे असते. 4 मानसिक सुसंगतता-वधू-वराची मानसिक जडणघडण कशी आहे, त्यांच्या आवडीनिवडी कशा आहेत याचा साधारण अंदाज पत्रिकेवरून सहज घेता येतो. जर मानसिक सुसंगतता नसेल, एकमेकांचा सहवास त्यांना आवडत नसेल तर जगणे असह्य होऊन जाते. या मुद्याचाही विचार करणे गरजेचे आहे 5. वर आणि वधू यांच्या महादशा यांचाही विचार करण्याची नितांत गरज आहे. बाकी सगळे मुद्दे जरी चांगले जुळत असले तरी जर महादशा अनुरुप नसतील तर एकत्र राहण्यामध्ये अडचण येऊ शकते.
महा उपायः मानसिक विकारावर वैद्यकीय उपचारासोबत हेही करून बघा- प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी टेम्बे स्वामींनी लिहिलेले स्थिर चित्त स्तोत्र म्हणत हनुमानाच्या पायाचा शेंदूर कपळी लावावा.
छोटी वास्तू टिपः गृह क्लेश नाहीसा होण्याकरता 8 पौर्णिमा, 8 कोळसे, 8 खिळे, 8 लाल मिरच्या घरावरून ओवाळून प्रवाहित कराव्या.
मेष
प्रशासनिक कामांकरता अनुकूल काळ आहे. लेखन कार्यामध्ये यश मिळेल. सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहाल. तब्येतीला सांभाळावे लागेल. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक करू नका. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील. उपाय उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे.
वृषभ
परिवारातील वातावरण आनंदी असल्याने तुमचा उत्साह वाढेल. जुनी येणी वसूल करण्याचा जरूर प्रयत्न करा. नवीन पदार्थ खाण्याचा मोह होईल. जमिनीच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्मयता कमी आहे. शेअर्समधून लाभ होऊ शकतो. नोकरीत वरि÷ांचे सहकार्य मिळेल. छोटय़ा गोष्टीवरून वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. मान सन्मान प्राप्तीचे योग आहेत.
उपाय भैरव मंदिरामध्ये वडय़ाचा नैवेद्य दाखवावा.
मिथुन
शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल. घरातील एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते. पैशाची आवक असमाधानकारक असेल. अपशब्द वापरण्यापासून स्वतःला दूर ठेवा. वाहन सुख उत्तम मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदारांना वरि÷ांचा त्रास संभवतो. जोडीदाराची साथ मिळेल. लहान-मोठय़ा अपघातापासून सावध रहावे. उपाय शंकराला दुधाचा अभिषेक घालावा
कर्क
दुसऱयांच्या कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप करू नका, प्रकरण अंगलट येऊ शकते. तब्येतीला सांभाळावे. कुटुंबातील वातावरण तितकेसे चांगले नसेल. प्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्याबाबतीत चांगली घटना घडेल. शेअर्समध्ये नुकसान संभवते. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
उपाय लाल गुलाबाची माळ देवीला अर्पण करावी.
सिंह
घरातील लोकांबरोबर लहान सहल आयोजित कराल. आनंदी वातावरण असेल. लिखाणाचे कौतुक होऊ शकते. सोशल मीडियामुळे फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याकरता योग्य काळ आहे. कपट-कारस्थानाला बळी पडण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या कौशल्याचे कौतुक कराल. लाभाची शक्मयता जास्त आहे.
उपाय अनाथाश्रमामध्ये फळांचे वाटप करा.
कन्या
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. त्याचा फायदा उचलावा. घरातील व्यक्तींचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखादा निर्णय मिळून-मिसळून घ्याल. तुमच्या युक्तीचे कौतुक होईल. येणी वसूल होतील. प्रवास टाळावा. शेअर्समधून फायदा होईल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाचे कौतुक होईल.
उपाय गरजूंना आर्थिक मदत करावी.
तूळ
कुटुंबातील सदस्य त्रासदायक ठरू शकतील. आरोग्याचा पाया मजबूत राहील. पैशांची आवक मनासारखी होणार नाही. कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत एखाद्या माणसामुळे त्रास होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराशी वादावादीचे प्रसंग येतील. लाभ चांगला होईल.
उपाय मारुतीला बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा
वृश्चिक
आरोग्याच्या दृष्टीने तितकासा चांगला काळ नाही. पोटाचे विकार संभवतात. घरामधील वातावरण चांगले असेल. प्रवासाचे योग आहेत. जमीन-जुमल्याच्या व्यवहारास गती येईल. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. नोकरीमध्ये त्रास होण्याची शक्मयता आहे. जोडीदाराशी मतभेद होतील. लाभाकरता विशेष प्रयास करण्याची आवश्यकता आहे.
उपाय गाईला हिरवा चारा घालावा
धनु
तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. पैशांची आवक वाढेल. नातेवाईकांच्या घरी भेट द्याल. कामाकरता प्रवास होईल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून नुकसान संभवते. प्रेमीबरोबर वादावादी होईल. कारण नसताना नोकरीत त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
उपाय वृद्ध व्यक्तीला औषधांचे दान घ्यावे
मकर
कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सामील व्हाल. नातेवाईक भेटल्यामुळे मन आनंदी असेल. तब्येत उत्तम असेल. प्रवास शक्मयतो टाळावा. छोटय़ा गुंतवणुकीतून नुकसान संभवते. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये एखाद्या घटनेचे वाईट वाटू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या सवयीमुळे वाद-विवाद होऊ शकतो. भाग्य साथ देईल.
उपाय तुळशीला दूधमिश्रित पाणी घालावे
कुंभ
तुमच्या बोलण्यामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. बोलताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करावा. आर्थिक आवक समाधानकारक असणार नाही. कुटुंबात वाद संभवतो. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे मन उदास असेल. जोडीदाराच्या वागण्याचा त्रास होईल. वाहन चालवताना सावध रहावे.
उपाय कुंभाराला दुधाचे दान द्यावे.
मीन
मानसिक त्रासामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कोणताही ताण तणाव घेणे टाळावे. कुटुंबातील व्यक्तींच्या सहवासात वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. एखाद्या समारंभामध्ये सामील होऊ शकता. लांबून एखादी खबर कळू शकते. परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर अनुकूल काळ आहे.
उपाय लहान मुलांना बत्तासे वाटावेत.
गीत- प्रा. बजरंग सरोदे
संगीत- दशरथ पुजारी
गायिका सुमन कल्याणपूर
क्रमांक-34