प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव तसेच हरिवंशराय बच्चन आणि त्यांचे योगदान या विषयावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. डी. एन. मिसाळे व अनिता पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीता पाटील, एस. बी. ताटे यांनी परिश्रम घेतले.