मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांचे प्रतिपादन : पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सभागृहात किसान सन्मान निधी वितरण
पेडणे / प्रतिनिधी
देशात प्रथमच शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. हे सरकार शेतकऱयांचे हित जोपासणारे आहे. कृषीविषकर तिन्ही बिले शेतकऱयांसाठी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱयांचे हित जोपासले आहे. शेतकरी जे पीक पिकवतो त्याला कुठेही विक्री करता येणार , हा अधिकार शेतकऱयांना आहे. शेतकरी माल कुठेही विकू शकतो हे बिल शेतकऱयांसाठी आहे . हे शेतकऱयांचे सरकार असून काँग्रेसला दलालांचे सरकार हवे म्हणून काँग्रेस आंदोलन करते, असा आरोप करून ,भाजपाला असे दलालीचे प्रकार यापुढे नको म्हणून कृषी बिल आणले आहे. खरा शेतकरी कधी रस्त्यावर उतरत नाही ,जे कोणी उतरले ते शेतकऱयांचे दलाल आहेत, असा दावा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पेडणे येथे किसान सन्मान कार्यक्रमात बोलताना केला.
पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सभागृहात किसान सन्मान निधी वितरिण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर , मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, कृषी उपसंचालक शिवानंद वागळे , पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब उपस्थित होते .
कूळ-मुंडकार खटले 2022 पर्यंत निकालात काढणार
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत पुढे बोलताना म्हणाले की , हे सरकार शेतकऱयांचे असून कूळ आणि मुंडकार यांचे जे अनेक वर्षे खटले प्रलंबित आहेत ते खटले 2022 पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत. सरकार हे भाटकरांच्या बाजूने नाही शेतकऱयांच्या हिताच्या बाजूने आहे. पेडणे तालुका शेतीच्या बाबतीत नंबर वन असणार, असा विश्वास व्यक्त करून, शेती कृषी रत्न सन्मान हा पेडणे तालुक्मयासाठी एका शेतकऱयांसाठी मिळतो ही अभिमानाची असून हा सन्मान पेडणे तालुक्यातील संपूर्ण शेतकरीवर्गाचा आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा करण्यास सर्वांनी हातभार लावून मोदीचे स्वप्न साकार करुया, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी रत्न पुरस्कार विजेते श्री. प्रभुदेसाई यांचा यावेळी त्यांनी गौरव केला .
शेतकऱयांमुळेच देश चालतो : उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे देशातील गरीब जनतेचे आणि शेतकऱयांचे हित सांभाळणारे आहेत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेते आहेत. शेतीविषयक जी बिले आणली जातात त्याला काँग्रेस विरोध करतात त्यांना जाब विचारायला हवा. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आंदोलनात घुसतात त्यांना शेतीविषयी सहानुभूती नाही ,विरोधकांचे कट कारस्थान शेतकऱयांनी ओळखावे आणि भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पेडणे तालुक्मयातील विकासाला सतत प्रोत्साहन देऊन योग्य तो निधी उपलब्ध करून दिला असेही त्यांनी सांगितले .
पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱयांचे हित पाहिलेः आमदार दयानंद सोपटे
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस त्या निमित्ताने किसान सन्मान निधी वितरित कार्यक्रम होतो आहे हा अविस्मरणीय दिवस आहे, असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे ,आजही देशातील शेतकरी त्यांचे वारसदार शेतीचा वारसा चालवतात म्हणून ही शेतीची क्रांती दिसत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱयांचे समर्थन करणारे आहे . भारत देश हा सुजालाम सुफलाम व्हावा हे अटजींचे स्वप्ने होते हे स्वप्ने पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले माञ कोणीही शेतकऱयांचे हित जपले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. म्हणूनच आज 18 हजार कोटी रुपये हे 9 कोटी शेतकऱयांना सन्मान म्हणून वितरित केले जात आहेत, असे सोपटे म्हणाले .
यंदा मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांना शासनाने मदत केली आहे. शेतकरी पुढे येऊन शेती करतात, अनेक पडीक शेतीचे मळे फुललेले दिसत आहे. देश आणि गोवा राज्य हे सुजलाम सुफलाम करायला शेतकऱयांनी संघटित होऊन काम करावे, असे आवाहनही सोपटे यांनी केले.
दरम्यान, शेतीविषयक मार्गदर्शन यावेळी धीरज परब यांनी केले.
प्रसाद परब व शिवानंद वागळे यांनी पाहुण्यांना फुलांची रोपटी भेट देण्यात आली. यावेळी तालुक्मयातील दहा भाग्यवान शेतकऱयांची निवड चिठ्ठय़ा काढून करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.