नंदगड / वार्ताहर
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पहिला पाऊस झाल्याने नंदगड व परिसरातील शेतकऱयानी त्यावेळी पेरणी केली होती. त्यानुसार सध्या भात पीक पोसवणीच्या मार्गावर असून काही ठिकाणी भाताला लोंब आलेली आहेत तर काही ठिकाणी भात पिकावर रोग पडला असून भाताचा रंग पिवळा झाला आहे. सुगीच्या तोंडावर पडलेल्या भातावरील रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून काय करावे या द्विधा मनस्थितीत आहे.
नंदगडसह खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात पीक तालुक्मयातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते .यावषी मध्यंतरीचे काही दिवस वगळता पावसाळय़ात बऱयापैकी पाऊस पडल्याने यावषी भात पिके जोमात आले आहे.
खानापूर तालुक्मयातील नंदगड, बिडी, हलशी, हलगा, कापोली, लोंढा, गुंजी, शिरोली, नेरसा, रामगुरवाडी, बरंगाव, गर्लगुंजी, चापगाव, लालवाडी, बेकवाड, इटगी, गोधोळी, भुरूणकी, पारिश्वाड, गंदिगवाड, लोंढा, कक्केरी, जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा भागात भातपीक घेण्यात येते. जांबोटी, कणकुंबी, शिरोली वगळता अन्य सर्वच भागात भाताची पेरणी करण्यात येते तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात भाताची रोप लावणी केली जाते. यावषी कृषी खात्यातर्फे तालुक्मयातील 40000 हेक्टर जमिनीत भात लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यावषी 36000 हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱयांनी भाताची पेरणी केली होती तर जुलै महिन्यात भाताचे रोप लावणी करण्यात आली होती.
मध्यंतरी काही दिवस पावसाने ओढ दिली होती. परंतु त्यानंतर पिकाला जेवढा अत्यावश्यक होता तेवढा पाऊस झाला. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. सध्या कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजेच माळरानावरील भात पिके पोसवणीच्या मार्गावर आहेत. महिन्याभरात सदर पिक कापणीला येणार आहे .
नंदगड हलसी परिसरात भात पिकावर करपा रोग
नंदगड, हलशी, भुतेवाडी परिसरात भात पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे भाताची पाने पिवळी झाली आहेत. वाढ खुंटली आहे तरी त्या ठिकाणी कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी भेट देऊन करप्या रोगावर निरीक्षण करून शेतकऱयांना औषध संदर्भात मार्गदर्शन करावे, अशी शेतकऱयाकडून विनंती केली जात आहे.
शेतवाडीतील बांध गेले वाहून
या वषीच्या पावसाळय़ात दोनदा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अती पाणी शेतात साचून अनेक ठिकाणचे बांध वाहून गेले आहेत. परिणामी शेतकऱयांच्या शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे .सरकारने संबंधित शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काही शेतकऱयांनी केली आहे.