भारतात निर्मिती कोरोनावरील लसींचे चीनने नाइलाजाने का होईना, पण कौतुक पेले आहे. भारतात निर्मित लसीची गुणवत्ता चिनी लसींपेक्षा कुठल्याही दृष्टीकोनातून कमी नाही. भारतीय लसी संशोधन आणि निर्मिती क्षमतेच्या पातळीवरही उत्तम असल्याचे ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित एका लेखात चिनी तज्ञांनी नमूद केले आहे. भारत लसीच्या निर्यातीची योजना आखत असून जागतिक बाजारासाठी हे चांगले वृत्त असू शकते. परंतु भारताचे हे पाऊल राजनयिक आणि आर्थिक उद्देशाने उचलले गेले आहे. भारत स्वतःच्या लसींचा वापर जागतिक राजकारणात स्वतःचा हस्तक्षेप वाढविणे आणि चीननिर्मित लसींसोबत स्पर्धा करण्यासाठी करत असल्याचे तज्ञांनी लेखात म्हटले आहे.
जगात भारत सर्वात मोठा लसउत्पादक आहे. स्वस्त मनुष्यबळ आणि चांगल्या सुविधांमुळे भारतीय लसीची किंमतही कमी असल्याचे ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे. या अहवालात जिलिन विद्यापीठाचा दाखला देत भारत जेनेरिक औषधांप्रकरणी पहिल्या स्थानी असून लसनिर्मितीत चीनपेक्षा मागे नसल्याचे म्हटले गेले आहे. जगभरातील जवळपास 60 टक्के लसींचे उत्पादन भारत करतो आणि अनेक देश कोरोना लसीचे डोस भारताकडून पाठविले जाण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. जागतिक बाजारांमध्ये भारतनिर्मित लसींच्या वाढत्या स्वीकारार्हतेदरम्यान ग्लोबल टाईम्सने हा अहवाल प्रकाशित केला आहे.