रमेश जंगल यांचे मत
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात आपण प्रगती साधली आहे. या प्रगतीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या संविधानाने सर्वांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या संविधानावर गर्व आहे. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, अभियंते व राष्ट्रीय नेते यांच्यामुळे भारतातील विकासाला प्राधान्य मिळाले आहे, असे मत अध्यक्ष रमेश जंगल यांनी व्यक्त केले.
येथील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी रमेश जंगल बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून एसजीबीआयटीचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एम. देवाप्पा उपस्थित होते. ज्ये÷ अभियंते सी. एन. वाली यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रभारी सचिव डॉ. विरण्णा डी. के. यांनी स्वागत केले.
यावेळी ज्ये÷ अभियंते व्ही. बी. जवूर, बी. डी. जाधव, बी. जी. धरेण्णी, बी. व्यंकटेश, एस. वाय. कुंदरगी, आनंद हावण्णावर, विलास बदामी, बी. एम. कल्लिगुड्ड, रविंद्र कल्याण, एस. एम. मत्री, व्ही. के. हुक्केरी, केरुर, एस. एम. मसुदी, बी. आर. नरसेण्णावर, एस. व्ही. होसपेटे, बी. एन. नाडगौडा व इतर मान्यवर उपस्थित होते.